शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराजांचे विचार आजही कालसंगत : पुष्पा भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 04:30 IST

देशात सर्वत्र अघोषित आणीबाणी असल्यासारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे याविरोधात राजकीय पक्षांना जोरकसपणे काम करावे लागेल. काँग्रेसनेही केवळ तात्पुरते राजकारण करण्यापेक्षा हा सामना दीर्घकालीन असल्याचे

ठळक मुद्देदेशात अघोषित आणीबाणी! राजकीय पक्षांना दीर्घकालीन लढ्यासाठी सिद्ध व्हावे लागेल

समीर देशपांडे  कोल्हापूर : देशात सर्वत्र अघोषित आणीबाणी असल्यासारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे याविरोधात राजकीय पक्षांना जोरकसपणे काम करावे लागेल. काँग्रेसनेही केवळ तात्पुरते राजकारण करण्यापेक्षा हा सामना दीर्घकालीन असल्याचे ओळखून लढाईची तयारी ठेवावी, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले.

प्रा. भावे यांना यंदाचा कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा प्रतिष्ठेचा ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार आज, मंगळवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते कोल्हापूर येथे सायंकाळी सहा वाजता प्रदान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, अशा परिस्थितीमध्ये निराशा दाटून येते, परंतु माणसं खाली मान घालून हे सहन करताहेत अशातला भाग नाही. जो तो ज्याला शक्य तितका विरोध करतो आहे. मात्र, राजकीय पक्ष विशिष्ट मूल्यांच्या आधारे याविरोधात ठामपणे उभे राहत नाहीत हे वास्तव आहे. असे काम करणाऱ्यांना शक्ती देण्याची भूमिका इतर पक्षांना घ्यावी लागेल.

जातीयवादाबाबत बोलताना प्रा. भावे म्हणाल्या, एका बाजूला तरुणाईचा एक गट जातिनिर्मूलनासाठी काम करतो आहे, तर दुसरीकडे असाच गट आपल्या अस्मितेचा प्रश्न म्हणून जातीला घट्ट धरून बसला आहे. हिंसाचाराचाही विषय महत्त्वाचा आहे. भाजप सत्तेत आल्यापासून अनेकजण हिंसेमध्ये लडबडलेले दिसून येतात. महाराष्ट्राबाहेर गोवंशहत्याबंदीवरून अनेकजण हिंसेवर उतरल्याची उदाहरणे आहेत.

महिलांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करून त्या म्हणाल्या, अशा घटनांमध्ये कमी वयाच्या मुलांचा असलेला सहभाग आणि वंचित वर्गातील मुलांची वाढती संख्या हे देखील चिंतेचे आणखी एक कारण आहे. कायद्याने या सर्व गोष्टी थांबतील असं मी मानत नाही. गुन्हे होतील त्याबाबत कायदा आपले काम करेल; पण मानसिकता बदलण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातूनच ठामपणे आपल्याला पुढे जावे लागेल. त्या म्हणाल्या, वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित असलेल्या वर्गातील मुला-मुलींना डॉक्टर किंवा इंजिनिअर करताना जर कर्जे काढावी लागत असतील, तर सर्वसामान्यांसाठी हे शिक्षण आवाक्याबाहेरचेच ठरते. कितीही घोषणा होत असल्या तरी मुस्लिम आणि दलितांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही हे वास्तव आहे.

शेतकऱ्याला उपाशी ठेवूनआपण काय खाणार?शेतीचा आणि शेतकºयांचा खेळखंडोबा चाललेला आपण रोज पाहत आहोत. याबाबतीत सर्वच राजकीय पक्षांनी यावर चिंतन करण्याची गरज आहे. शेतकºयाला उपाशी ठेवून आपण काय खाणार आहोत? हा साधा विचार आपल्या मनाला कसा शिवत नाही? असा सवाल यावेळी प्रा. भावे यांनी उपस्थित केला.महाराष्ट्रात समाधानकारक परिस्थिती नाहीकोणत्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची स्थिती समाधानकारक आहे असे वाटते, या प्रश्नावर सध्या तरी तसे काही दिसत नसल्याचे स्पष्ट मत प्रा. भावे यांनी व्यक्त केले. याआधीचा महाराष्ट्र काही बाबतीत तरी वेगळा वाटत होता, परंतु वाढत्या गुन्हेगारीमुळे अशी परिस्थिती आता राहिली नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करून कर्नाटक पोलीस गुन्हेगारांपर्यंत जातात, परंतु नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा असा तपास का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शाहू महाराजांनी करवीर संस्थानमध्ये जे क्रांतिकारी निर्णय राबविले, ते दूरदृष्टीचे होते. दलितांपासून ते मुस्लिमांपर्यंत अनेकांची काळजी या राजाने घेतली होती. त्यांचीच धोरणे, त्यांचा विचार आता आधुनिक काळाशी सुसंगत बनवून पुढे न्यावा लागेल.- पुष्पा भावे, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती